ठाणे
घोडबंदर रोडवरील उल्लास खाडीशेजारी बांधण्यात आलेला ब्रिटीशकालीन बंधारा फुटला होता. या फुटलेल्या बंधाऱ्याचे काम आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे खाडीच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तब्बल अडीच ते तीन हजार लहान-मोठ्या शेतकर्यांची शेती जमीन वाचवण्यासाठी ब्रिटीशकालीन बंधारा बांधण्यात आला होता.
हा बंधारा गेल्या पावसाळ्यात फुटला होता. या फुटलेल्या बंधाऱ्यामुळे आगामी पावसाळ्यात खाडीचे पाणी शेतात जाऊन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. या भीतीनं शेतकरी गेल्या ७ महिन्यांपासून खारलॅण्ड विभागाला बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी करत होते. अखेर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका घेत पाठपूरावा केल्यानंतर बुधवारपासून तुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं. याबाबतची माहिती खारगुनी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.
घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा ते वाघबिळ पर्यंत उल्लास खाडीशेजारी ९ फूट उंच आणि १५ फूट रुंद बंधारा बांधण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे खाडीच्या खाऱ्या पा
बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रीया लडा खारगुनी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे. या जागेवर मेट्रोचे कारशेड बनवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासह विविध मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या नाहीत. या संदर्भात देखील आमदार प्रताप सरनाईक यांची अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
0 टिप्पण्या