भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्था आणि विवाह संस्थेला विशेष महत्त्व आहे. विवाहाच्या वेळी सप्तपदी व अन्य विधितून संस्कार केले जातात. विवाहानंतर कुटुंब संस्कृतीनुसार वाटचाल अपेक्षित असते. त्यामुळे कौटुंबिक वाद कितीही झाले, तरी संयम आणि सामंजस्याला प्राधान्य देत संसाराचा गाडा सुरळीत केला जातो. कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक वारसा यातून जपला जातो. परंतु, बदलत्या काळात जात, धर्माचा विचार न करता प्रेमविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशा विवाहांना कधी दोन्ही कुटुंबाची संमती असते, तर कधी वितंडवादाचे स्वरुपही येते. अनेकदा सामाजिक शांतताही भंग होत असते. अनेक प्रेमविवाह आदर्श ठरल्याचे पहायला मिळते. तर काही प्रेमविवाह टिकत नसल्याचेही दिसून येते. विवाह कुठल्याही स्वरुपाचा असला, तरी नंतरचा संसार टिकणे महत्त्वाचे असते. परंतु, बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीतून पती-पत्नींमध्ये होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहचतात. त्यामुळे करार करून लग्न टिकतील का? असाही प्रश्न पुढे येतो.
0 टिप्पण्या