भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेटआंबे खाऊन मुले होतात* संतापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे* हातात तलवारी घ्याव्या लागतील..इंग्रजी शिकणे मूर्खपणा आहे..म्लेंच्छ(संस्कृत भाषा न येणारे)मारले पाहिजेत..लेंडकांनो,...काकडा लावावा लागेल..शिकून माणूस गांडु होतो.(भिडे असे ब्राह्मण मुलांना सांगत नाहीत)...... कडून देशप्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे हागणदारीत मोती शोधणे होय.आरक्षण आणि शेतीमालाला हमी भाव मागणे म्हणजे देशप्रेम नव्हे..महात्मा फुले देशद्रोही होते..आंबेडकर......करत होते..शाहू महाराज...होते.जपान मनुस्मृतीनुसार चालतो..डॉ बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचे समर्थक होते..बुद्ध कामाचा नाही. अशी देशविरोधी वक्तव्ये करून समाजासमाजात तेढ निर्माण करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची विणापरवानगी सभा आयोजित केल्याप्रकरणी संबंधित आयोजकाविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलिसाना भेटून केली
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे कृत्य करीत असतात त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी तीव्र नाराजीची भावना आहे. भीमा कोरेगाव दंगलीचा त्यांच्यावर ठपका आहे शिवाय आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाविषयी त्यांनी नुकतेच चीड आणणारे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून केली जात आहे.अशा या वादग्रस्त व्यक्तीच्या सभेचा कार्यक्रम संघर्ष नगर चांदीवली कुर्ला पश्चिम या ठिकाणी रविवार दिनांक १६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता मात्र भीम आर्मी सह विविध संघटनानी साकीनाका पोलीस ठाणे येथे निवेदन देवून सदर कार्यक्रमाला पोलीस परवानगी लेखी निवेदन दिल्यानंतर पोलीसांनी सबंधित आयोजकांना परवानगी नाकारली होती मात्र साकीनाका पोलीसांनी परवानगी नाकारल्यानंतर या आयोजकांनी हाच कार्यक्रम घाटकोपर पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील मन्नू ईमारत या ठिकाणी सबंधित चिराग नगर घाटकोपर पश्चिम येथील पोलीस ठाण्याची परवानगी न घेता आयोजित केला होता याची कुणकुण लागल्याने भीम आर्मी व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या विरोधात आंदोलन केले होते
0 टिप्पण्या