दृढ संकल्पाशिवाय वर्षावास अपूर्ण राहतो. उपोस्थासह अष्टशिलांचे पालन व्हायला हवे. श्रद्धापूर्वक दान आणि पुण्यकर्म केल्याने वर्षावास काळातच सुखाची अनुभूती येते, त्याचे अनेक दाखले देत भदंत उपाली आणि त्यांच्या भिक्खु संघाने उपस्थितांना धम्मदेशना दिली. वांद्रे ( पूर्व ) टीचर्स कॉलनी येथील संघमित्रा सांस्कृतिक केंद्र समिती, संघमित्रा बुद्ध विहार आणि बौ. पं. स. शा. क्र. ४०३, यशोधरा महिला मंडळ, भिमप्रेरणा, गणेश दर्शन, रिद्वी सिद्धी वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास समापन सोहळा रविवार दि.२० रोजी भदंत बोधिशील भदंत उपाली, भदंत करुणासागर, भदंत चंद्रप्रिय भदंत अश्वजीत भदंत निर्वाण आणि भदंत संघपाल यांच्या भिक्खु संघाला अष्टपरिष्कार चिवरदान दानपारमिता करून समाप्ती सोहळा संपन्न झाला.
सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहणांनी सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर भिक्खु संघ आणि अष्टपरिष्कार चिवरासह भव्य मिरवणूक तसेच त्रिशरण आणि पंचशील गाथेचे पठण करून भिक्खु संघाला भोजनदान करण्यात आले. उपस्थिताना भिक्खु संघाने धम्मदेसना आणि आशीर्वाद दिले. यावेळी संघमित्रा सांस्कृतिक केंद्र समितीचे अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष गौतम जाधव, शैलेंद्र धोत्रे, कैलास कांबळे, तुळशीराम तांबे, अशोक साळवे, भागुराम अमृता कांबळे, आशा प्रविण मर्चंडे, जया मोरे, संतोष कदम आदी मान्यवरांसह खार वांद्रे आणि सांताक्रुज परिसरातील बौद्ध बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
0 टिप्पण्या