मी शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे. मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल. भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला पाठिंबा आहे. - एकनाथ शिंदे
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटल्याचे आरोप केले. चार तास सुरु असलेल्या या गोंधळाची राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची टीप मला भाजमधील एका नेत्यानेच दिल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले होते. अखेर क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांना स्वत:च्या गाडीमध्ये घेत बाहेर काढलं होतं. भाजपतर्फे नोटावाटप केल्याच्या आरोपांप्रकरणी तुळींज पोलिसांतर्फे कारवाई सुरू आहे. त्याच दरम्यान, परदेशी नागरिकाचे हॉटेलमध्ये वास्तव्य असूनही त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबर रोजी या हॉटेलमध्ये झालेल्या साडेतीन तासांच्या नाट्यादरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी ३० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली. दरम्यान, प्रचाराचा कालावधी संपला असतानाही, हॉटेल बेकायदा वापरण्यास दिल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलमालक आणि चालकावर याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या